निसर्गाच्या सानिध्यात,
स्वप्नांच्या त्या विश्वात,
आठवणींच्या त्या डोहात,
त्या फुलांच्या मळ्यात,
जेंव्हा रमतंय माझं मन..
तेंव्हा तेंव्हा आठवतो तो क्षण..
ते स्वप्नरूपी जगणं,
तुझ्या विषयीच बोलणं,
गंमत तुझी करणं,
वाट तुझी पाहाणं,
जेंव्हा फुलते मन स्पदंण..
तेंव्हा तेंव्हा आठवतो तो क्षण..
हि बहरलेली हिरवळ पाहून,
ते नदीचे पाणी पाहून,
तो समुद्र किनारा पाहून,
आभाळातील तो चंद्र पाहून,
जेंव्हा करतो मी मंथन..
तेंव्हा तेंव्हा आठवतो तो क्षण..
दिवस ते आठवून,
मनात तुला साठवुन,
सांगतो तुला पटवून,
बोलणं तुझं ऐकून,
जेव्हा तुटतंय माझं मन..
तेंव्हा तेंव्हा आठवतो तो क्षण..
- रत्नकांत सुर्यवंशी
4 Comments
Mind blowing bro...👌👌
ReplyDeleteTuch lihlas ka hi Kavita ?
Ha...bhai....tumch nav comment khali lihit chala.
DeleteOjas Rock
DeleteOjas Rock
ReplyDeleteRatnkant khup chan lihlis kavita...
We are waiting for your next part ....🤗🤗